गणेश शिंदे
सखे
सखे...
तुझंमाझं अंतर कितीतरी कोस'
मग मी म्हणेन,'लाखो कोसावर चंन्द्र
अमावस्येला त्याच्यावर का नसतो रोष?'
सखे....
तू म्हण, 'तुझ्यातला रस खरचं संपलाय.'
मग मी म्हणेन,'हा रस्ता तुझ्यासाठी थांबलाय,
रस्त्याने जातांना कंटाळा आला तरीही
कडेने सावलीची झाडं असतात..मग त्यांच काय?
सखे....
तू म्हण,'वेड्या,तुला कळतं कसं नाही?'
मी म्हणेन,तुला कळतं,पण वळत नाही
की,अधाशी वणव्यातही,लपलपत्या ज्वाळातही,
आगीच्या खेळातही,काही गोष्टी जळतं नाही.
सखे....
तू म्हण, 'खरचं,माझ्याकडून मी तुला विसरले'
मी म्हणेन,विश्वासाचे धागे असे कसे विरले?
मुसळधार पावसात जीव जाळणारे ऊन्ह आले
ऋतु असे कसे,बिनबोभाट,न सांगता फिरले?
सखे...
तू म्हण, 'खरचं तुझा काहीच उपाय नाही'
मी म्हणेन,हा आजार असा जाणार नाही
एकडाव लढता लढता मेलो तरी बेहत्तर
पण मृत्युच्या भयाने जगणं सोडणार नाही.
सखे....
तु म्हण, 'मी आता काहीचं बोलणारं नाही'
निर्धाराने....मी म्हणेन मीही काहीचं बोलणार नाही
तुझ्यासहित,तुझं आयुष्य माझ्यापेक्षा सुंदर आहे,
खरचं त्याला असं खीळ लावुन चालणारं नाही.
सखे.....
तु सरतेशेवटी. ......................स्तब्ध राहशीलं
भिरभीरत्या नजरेने इकडे तीकडे पाहशीलं
मी पाठमोरा होवुन चालु लागल्यावर..............
स्वताच्याच आसवातं पुन्हा पुन्हा वाहशिल.....
गणेश शिंदे
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या